सध्या मोबाइल हा जणू आयुष्याचाच अविभाज्य भाग असल्यासारखे आपण सर्व जण वागत असतो. संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत या मोबाइलवर प्रत्येक जण अवलंबून असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. पण कधी विचार केला आहे का की, या मोबाइलचे जितके फायदे आहेत त्याहून अधिक तोटे देखील आहेत. या मोबाइलच्या अतिवापरामुळे तरुण वयातच अनेकांना कानांचे, डोळय़ांचे अनेक आजार झालेले त्यामुळे पाहायला मिळतात. मोठय़ांपासून ते लहान मुलांपर्यंत सारेच जण याच्या अधीन होत चालले आहेत.
1) ब्रेन ट्युमर
सेलफोनचे जे electromagnetic रेडिएशन निघतात. त्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या ब्रेनवर होतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार अतिरेकी वापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असतो.
2) तोंडाचा ट्युमर वाढण्याची शक्यता
नुकत्याच झालेल्या मेडिकल सर्वेनुसार सेलफोनच्या अतिरेकी वापरामुळे mouth cancer ची शक्यता वाढते. त्यामुळे खूप आवश्यक असेल तेव्हाच फोनचा वापर करावा.
3) सुसंवादाची कमी
प्रत्यक्ष संवाद हा सगळ्यात उत्तम! समोरासमोर बसून संवाद साधल्याने संबंध चांगले राहतात,तसेच कुठल्याही समस्येचे निवारण लवकरात लवकर होते. पण, आजकाल मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे संवाद हा फारच कमी झालेला आहे. प्रवासात पण जेव्हा सगळे ग्रुपनी जातात,तेव्हा गप्पागोष्टींपेक्षा सगळेजण मोबाईलवरच व्यस्त असतात.
4) एकाग्रतेचा अभाव
सेलफोनच्या अति वापरामुळे एकाग्रतेचा अभाव आढळून येतो. शारीरिक तसेच मानसिक पण ताण पडतो. मुले अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असतात व internet चा वापर करतात. त्यामुळे मुलांचे नापास होण्याचे प्रमाण हे वाढतच आहे.