देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज मोठी दुर्घटना घडली आहे. येथील कुर्ला परिसरातील नेहरू नगरमधील एका निवासी सोसायटीमध्ये सकाळी सुमारे २० मोटारसायकलींना आग लागली. या सर्व मोटारसायकली पार्किंगमध्ये उभ्या होत्या. या आगीत सर्व मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत.
दरम्यान,अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या पार्किंग मध्ये अनेक वेगवगळ्या मॉडेलच्या गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या.पण आग खूप जास्त प्रमाणात सगळीकडे पसरली असल्यामुळे त्या सगळ्या गाड्या जाळून खाग झाल्या आहेत. ही आग कशी लागली याचा शोध सुरू आहे.