कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे देशवासियांच्या चिंतेत वाढ झाली. संपूर्ण देशात भितीचं आणि दहशतीचं वातावरण आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या. या नव्या व्हेरिएंटबाबत केंद्रीय राज्यमंत्री भारत पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. “भारतात अद्याप डेल्टाक्रॉन हा कोरोनाचा खतरनाक वेरियंट आलेला नाही”, अशी माहिती भारती पवार यांनी दिली. या भारती पवारांनी दिलेल्या या माहितीमुळे देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान कोरोना नियमाबांबत सरकराने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. केंद्र सरकार कोरोनाचे निर्बंध 31 मार्चपासून हटवण्यात येणार आहे. मात्र तरीही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालणं करणं बंधनकारक राहणार आहे. केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना याबाबतचं पत्र पाठवलंय.