कोरोना महामारीला दोन वर्षे होत आहेत. त्याने केलेले दूरगामी परिणामही आता दिसू लागले आहेत. कोरोनाने जगभरातील लाखो कुटुंबांचे भविष्य नष्ट केले आहे. एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार कोरोनाने भारतीयांची दोन वर्षे कमी केली आहेत. इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ पॉपुलेशन स्टडीज नुसार २०१९ मध्ये भारतीय पुरुषांचे सरासरी आयुष्य हे ६९.५ वर्षे होते. २०२० मध्ये कमी होऊन ते ६७.५वर्षांवर आले आहे. याचप्रमाणए महिलांचे आयुष्य हे ७३ वर्षे होते ते आता ६९.८वर्षांवर आले आहे.
गेल्या दोन वर्षांत ३५ ते ६९ वर्षे वयोगटामध्ये मृत्यूदर जास्त होता. त्याचा परिणाम या आकडेवारीवर झाला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यूदर कमालीचा वाढला आहे. मार्च २०२० ते आतापर्यंत चार लाख मृत्यू झाले आहेत. डेटा स्पेशालिस्टनी भारतात यापेक्षा कित्येक पटींनी जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.