महाराष्ट्र सरकारने राज्यातील पूरग्रस्तांसाठी ११,५०० कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील लोकांना या पॅकेजचा लाभ मिळेल. यासह, काही रक्कम पुरामुळे नष्ट झालेल्या पायाभूत सुविधांवर देखील खर्च केली जाईल.
राज्य मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयानुसार, पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या खात्यात थेट १०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.नुकसान लक्षात घेता, पूरात कोसळलेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी १५,००० ते १.५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम लोकांना दिली जाईल. तसेच पूरग्रस्त सर्व दुकानदारांना ५०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. ग्रामीण रस्ते, जुने पूल, शाळा आणि इतर सरकारी पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी २५०० कोटी खर्च करण्याची योजना आहे. राज्य आणि केंद्र सरकारने पूर आणि भूस्खलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांसाठी काही आर्थिक मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, आता या घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना एकूण ९ लाख रुपयांची मदत दिली जाईल. यामध्ये राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून चार लाख रुपये, पंतप्रधान मदत निधीतून दोन लाख रुपये, मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक लाख आणि राज्य सरकारकडून स्वतंत्रपणे शेतकऱ्यांना दोन लाख रुपये दिले जातील. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये २२ जुलैपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे.