मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांनी आज महाराष्ट्र राज्यातील जनतेला संबोधित करताना आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याची घोषणा केली आहे. यासाठी राज्य शासनाने सरकारी जमीन मोफत दिली आहे. या निर्णयामुळे आरे कारशेड विरोधातील आंदोलनकर्त्यांचा विजय झाला आहे.
मेट्रो ६ आणि मेट्रो ३ साठी कार डेपो कांजूरमार्ग येथे कॉमन असणार आहे. यासाठीची जमीन गेल्या आठवड्यात शून्य रुपये किमतीने MMRDA च्या ताब्यात देण्यात आली आहे. मातीचे परीक्षण सुरू झाले आहे.
नेहमी सांगितले जात होते की यासाठी ₹ १०,००० कोटींचा खर्च होईल पण हे विनामूल्य होत आहे.
आरे येथील ८०८ एकर जमीन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे. ९ महिन्यानंतर, सादर जमीन वनक्षेत्र म्हणून घोषित केली जाईल. जगातील इतर कोणत्याही शहरामध्ये ८०८ एकर जमीन वन म्हणून घोषित केली असेल असे मला वाटत नाही.
आरे येथे जंगल म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रातील आदिवासी, तबेले असतील, त्यांचे सर्वांचे हित जपले जाईल.
तसेच आरेतील वृक्षतोडीविरोधात खंबीरपणे उभे राहिलेल्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे.
या निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उपमुख्यमंत्री अजित पवार जी, मंत्री बाळासाहेब थोरात जी, अनिल देशमुख जी, एकनाथ शिंदे जी, संजय राठोड जी, सुनील केदार जी, संपूर्ण महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर ताई यांचा आभारी आहे.
दरम्यान, तसेच MMRDA, मुंबई मेट्रो, वनविभाग, नगरविकास विभाग, महसूल विभाग, आरे आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो.
हा सर्व मुंबईकरांचा विजय आहे.