कोरोनाची लागण झालेल्या दोघांचे मृत्यू देशात झाले. त्यामुळे कोरोना हे राष्ट्रीय संकट म्हणून केंद्राने जाहीर केलं आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. आता राज्य सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून करोनाग्रस्तांचा सगळा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे राज्यातील सगळ्या शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढलं आहे. सोमवारपासून पुढची सूचना मिळेपर्यंत ३१ मार्चपर्यंत शाळा बंद राहतील असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.