कोणताच रोग नाहीये हा…आयुष्यरूपी चिरंजीवी असलेल्या महाभारतातील ,रामायणातील महान व्यक्तींनी फेकलेले विषाणूजन्य अदृश्य अस्र आहे हे असे म्हणायला हरकत नाही .परमेश्र्वराचे असलेले अस्र -शस्र हे फक्त—– विध्वंस ,नाश .एवढ्याच गोष्टी करत नाही .तर त्यातून चांगले ,निरामय , वैभवशाली , सकारात्मक दृष्टी देणाऱ्या अनेक गोष्टी निर्माण करू शकतो व त्या केलेल्याही आहेत. हे आपण जाणतोच .
असं म्हटलं जातंय शत्रू राष्ट्र स्वत:स्पर्धेत टिकण्यासाठी व सर्व जगावर अधिराज्य करण्यासाठी याप्रकारे नवनवीन क्लुप्त्या करून कधी विविध आजार तर , कधी विषाणू , कधी व्यसनांच्या गर्तैत लोटणारी उत्पादने तयार करून शत्रूला हरवू पाहतोय . पण नेमके आपण हेच विसरतोय .हे सर्व करणारा कोण ? दोन पायाचा माणूसच ना आणि ह्याची निर्मिती करणारा कोण बरे! त्या शक्तीवर आपण कुरघोडी करू पाहत आहोत .तर तो कसा गप्प बसणार !. एका दगडात दोन पक्षी मारले असे आपण सर्रास म्हणतो . पण या अदृश्यरूपी अस्राने आपल्याला सकारात्मक व नकारात्मक दोन पक्षी मारून .अशा अनेक गोष्टींचा उलगडा करून दाखवला आहे . स्वच्छतेचे मुलमंत्र , सामाजिक बांधिलकी , संघटीत वृत्ती , समयसूचकता , कर्तव्यदक्षता,सर्वधर्म समभाव , सेवाभावी वृत्ती,शत्रुही आपला मित्रच हे समजण्याची माणूसकी ........अशी अनेक मुल्ये ज्याची यादी वाढत जाणारी मारूतीच्या शेपटाप्रमाणे वृद्धींगत झालेली आपल्याला पाहायला मिळाली . नकारात्मक बदल म्हटला तर सर्वात मोठी जिवित हानी व ती रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे आलेली आर्थिक मंदी .यांचा आपल्याला मुकाबला करावा लागणार आहे . या गोष्टींना आपण तोंड देऊ शकू जर,माणूस शिल्लक राहीला व माणसातील माणुसकी जिंवत राहीली तरच ना...! येणारी आपत्ती ही विधात्याने दिलेली एक शिकवणूक असते
जिंदगी कीपाठशाला ह्यालाच म्हणतात कोरोना शाप की वरदान असे प्रत्येकाच्या मनात येऊन गेले असेल होय ना! जसे दुःखाच्या झालरला सुखाची किनार असतेच की, तसेच हे सारे घडत आहे या विषाणूने गरीब- श्रीमंत ही दरी मिटवली भलेभले, मस्तीत चारचाकीमध्ये हिंडणारे घरी बसले . कामधंदा बंद म्हणून हताश झाले पायी चालू लागले, घरात स्वतःची कामे करू लागले.
कोरोनामुळे घेतली धास्तीभल्याभल्यांची उतरली मस्ती…नको वाटतेय आता त्यांना बंदीप्रतिक्षेत आहेत कधी मिळेल संधी…
मध्यमवर्गीय कुटुंब एकत्रित येऊन प्रत्यक्ष नाही भेटले तरी एकत्रित कुटुंब म्हणजे काय हे नक्कीच कळले असावे म्हणूनच साऱ्यांनी एकत्रित येऊन या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारला आपल्या भारताला सर्व सुचनांचे पालन करून सहकार्य करू या .
कोरोनामुळे वायुप्रदूषण नियंत्रणात आलेवातावरण शांत अन ताजेतवाने झालेइच्छा एक मनी जैविक युद्ध संपून जावोभारत पुन्हा सुजलाम सुफलाम होवो
२२मार्च पासून आपण सरकारला सहकार्य करीतच आहोत तसेच पुढील येणाऱ्या दिवसांसाठीही बंदिस्त राहू या .“गर्दी टाळा , कोरोनाला बसेल आळा”.या प्रमाणे वागूनझाले गेले विसरुन जावे पुढे सरसाऊनी नियम पाळावे अन जिवनगाणे गातच राहावे असे म्हणत सहकार्य करूया.जेव्हा सारं जग म्हणत असतं पराभव मान्य करतेव्हा आशेची झुळूक अलगदकानात सांगते पुन्हा एकदा प्रयत्न करम्हणूनच मला खात्री आहे की आपल्या देशातील तज्ञ डॉक्टर या जैविक विषाणूवर प्रतिबंधक लस शोधतील आणि या मायावी कोरोना राक्षसाचा नायनाट करतील
–हर्षा हिरा पाटील, पालघर