अनेक शास्त्रज्ञांनी त्यांच्या वक्तव्यातून आपणास सर्वांनाच सध्या करोनासोबत जगण्याची तयार तयारी दाखवायला हवी अशा प्रकारचा मतप्रवाह येताना दिसत आहे परंतु अशा प्रकारची मते येण्याआधीपासूनच मजुरांनी गोर गरिबांनी अशा परिस्थितीत स्वतःला झोकून स्थलांतर करण्याचा मार्ग अवलंबलेला आहे करण्याची सुरुवात केलेली आपणास दिसून येते अत्यंत हृदयद्रावक अशा घटना आपणास समाजाच्या प्रत्येक स्तरांमध्ये घडताना दिसून येत आहेत त्यामध्ये अनेक मैलांचा पायी प्रवास आहे आर्थिक अडचणी आहेत भुकेचा उद्भवणारा प्रश्न आहे स्त्रियांना येणाऱ्या समस्या अडचणी आहेत लहान मुलांची होणारी ससे होरपळ आहे वृद्धांची दयनीय अवस्था ही देखील या प्रश्नांमधील मुख्य अडचण असलेली दिसून येते मजुरांचे स्थलांतर पाहिले गेले असता त्याच्याकडे सद्य स्थितीत कमाईचे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे म्हणजेत आर्थिक अडचणीमुळे त्यांनी स्थलांतरण करण्याचा पर्याय स्वीकारलेला दिसून येतो.
परंतु त्यावेळी दळणवळणाच्या साधनांची कमतरता असल्याचे दिसून येते तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा रोजगार नाहीसा झाल्यामुळे त्यांच्या घरातील चुली बंद राहिल्या आहेत परिणामी भूकबळीची शक्यता वर्तवणारे अनेक मतप्रवाह येऊ लागले आहेत तसे स्त्रियांच्या जीवनातही आमूलाग्र बदल घडून येत आहेत सध्याच्या स्थितीत अनेक स्त्रियांच्या प्रसूती या रस्त्यावर घडून आल्याच्या बातम्या रोज झळकत आहेत वयाने लहान असलेल्या मुलांचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण या सर्व प्रसंगातून होत आहे त्याचा परिणाम पुढील काही दशकांपर्यंत राहील अशीही शक्यता वर्तवली जात आहे वृद्धांची अवस्थाही अत्यंत बिकट असलेली आपणास दिसून येत आहे कारण जे एकटे राहत आहेत त्यांना स्वतःच्या गरजांसाठी बाहेर पडावे लागत आहे तसेच खाजगी दवाखाने काही प्रमाणात सुरू झालेले आहेत परंतु त्या दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत हे व अशा प्रकारचे अनेक प्रश्न समाजातील प्रत्येक घटकाला भेडसावत आहेत परंतु मनुष्य हा समाजशील प्राणी आहे व त्याचबरोबर संपूर्णतहा सकारात्मक आहे परिणामी त्यांच्यातील हि सकारात्मकता नकारात्मकतेवर मात करून पुढे वाटचाल करत आहे.
– प्रांजल सिंगासने